Saturday, June 18, 2016

बलात्कार....... हो! कठीण आहे बा .....

बलात्कार.......


सहज गप्पा मारत बसलेलो मी अन माझा मित्र ,चहा सिगरेट आणि गप्पा हे कोम्बिनेषण,जास्तच सिरिअस असले तर दारू ,पेपर मध्ये बातमी दिसली ,लग्नाचे आमिष दाखवून मुलीशी सतत दोन वर्ष बलात्कार ,कलम ३७२ च्या अंतर्गत २१ वर्षीय तरुण अटकेत .....वाचून मित्र बोलला


साला यांना नंगे करून हाणायला पायजे भर चौकात ...


(मला त्या पेक्षा ही घाण शिक्षा द्यावी वाटते  या  लोकांना ,पण  फरक  आहे  )
मित्रा,बलात्कार हा  देशातला   सर्वात  मोठा  गुन्हा  म्हणून  मान्य  करायला  हवा  आपण  सर्वांनी ,पण अश्या केसेस  मध्ये जी  आज  आपण  वाचली, ही  केस  अशीच  असेल  मला  नाही  वाटत ,बातम्यांवर  किती  विश्वास  ठेवावा,हे आपल्याला  कळायला  हवे,हे बघ साधे  आहे ,तरुण  मुले प्रेमात  पडतात,मानसिक त्यानंतर  शारीरिक  जवळ  येतात,आणि हे  कितीही  अमान्य  केले तरी  असे आहेच असे होते,काही काळानंतर त्यांच्यात  भांडणे  चालू  होतात ,(सर्व कपल्स नाही  पण ८० टक्के कपल वेगळे  होतात, एकमेकांवर  प्रेम  करणारे एकमेकांचा द्वेष करायला लागतात,आता खरी  गोम  चालू  होते ,  दोघामध्ये  मतभेत होतात त्यांनतर  मतभेद ,काहीवेळेस हे मतभेद  इतक्या टोकाला  जातात ,की  एकमेकांचा  इतका  द्वेष  चालू  होतो आणि  त्यातून असे  प्रकार  घडतात ..खरेतर स्वमर्जीने हे  एकमेकांसोबत  मानसिक  व शारीरिक दृष्ट्या जोडल्या गेलेले असतात ,दोघांच्या  मर्जीनेच  झालेले  असते  जे  झाले ..पण महिला  प्रधान  कायदा, याचा असाही फायदा  उचलला  जातो ...
(माझे  बोलणे  पूर्ण  व्हायच्या  आधीच  मित्र  बोलला  )

देव्या,हे  ठीक  आहे ,पण  अश्या  केसेस  आहेत  जिथे मुल  मुलीला  फसवतात ,मुलाचे मन भरले  की  मग  तो  मुलीला सोडून  देतो ,ही  तशी  केस असेल  तर ...
(यावेळेस  त्याने  मधात  टोकले  याचे  वाईट नाही  वाटले )

बरोबर  ना असे जे  लोक असतात त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच  हवी ,पण यात  अजून  एक गोष्ट  आहे ,हे बघ  जर  त्याने  आधीपासून याच  उद्देशाने त्या  मुलीशी संबंध  ठेवले असतील  तर  तो बलात्कार आहेच ,आणि शिक्षा मिळायला हवी (च)..पण ते दोघे  सोबत होते हळू हळू मुलाला  कळायला  लागले  की  आपण  या  मुलीशी जन्मभर नाही  राहू  शकत ,आणि  मग  त्याने तसे त्या  मुलीला  सांगितले तर  मग याला बलात्कार  म्हणता येयील का ?होऊ शकते मुलीचे वागणे स्वभाव चुकीचे असेल म्हणून कदाचित वेगळा व्हायचा निर्णय  घेतला असेल त्याने ,त्या वेळेस  याला बलात्कार  कसे  म्हणू शकतो आपण , आणि  मुलीने कम्प्लेन  केली कि  लगेच  मुलावर  कार्यवाही चालू  होते ,

म्हणजे देव्या ,त्याला कळले  की तो  अन ती सोबत नाही राहू शकत ,इतके दिवस आधी  का नाही कळले मंग ?
मित्रा ,माणूस बदलत  जातो  वेळेनुसार सर्वात बदल होत असतात ,काही वर्षापूर्वी एखाद्या गोष्टी बद्दल असेलेल मत ,नंतर बदलते आपले ,निसर्गाचा नियम  आहे बदल होत असतात,आणि  ज्या जोडप्यांचे तलाक  होतात ,तिथे  आपण बलात्कार असा  आरोप  लावतो  का नवर्यावर ,त्यांना ही  नंतर लक्षात येते कि नाही पटत आहे ,आणि सर्वात म्हत्वाचे , जगात जितके प्रेमप्रकरण होतात त्यातले चल  पकडू ,७०  टक्के  मुलीना मुले नंतर नाही म्हणतात  ,(माझ्यावर पुरुष प्रधान लिहितो असा आरोप नको म्हणून )  ,पण ३० टक्के असेही आहे  ज्यात मुली लग्नाला नाही  म्हणतात (घरच्यांचा दवब वगेरे वगेरे,बघ मुलींचा विषय आला  की  मी  लगेच त्यांची मजबुरी पण दिली ,मुलासाठी नाही दिली  ),मग  ज्या  मुलांना मुलीनी नाही  म्हटले ,अश्या  ककिती मुलांनी त्या मुलींवर केस टाकली आहे  रे कि या मुलीनी माझ्यावर बलात्कार केला आहे म्हणून ,एक तरी  केस आठवते  का ?कित्येक  अशी मुले आपल्याला बार मध्ये दिसतात ,कारण मुले शारीरिक पेक्षा मानसिक बलात्काराला  जास्त महत्व देतात ,अन बघ ना शारीरिक बलात्कार साठी  कायदा  आहे मुले वापरत नाही ,मानसिक बलात्कारा साठी कायदा नाही ,स्वत:ला  त्रास देतात असे कित्येक मित्र आहे  आपले ..कोणीतरी  आजवर मुलीवर असा  आरोप  केलाय  का ?तुझेच  घे  रे  तू  केलेस  का  ?


देव्या  मी  तिच्यावर प्रेम  करायचो (करतो )आणि  मी समजून घेतले  तिला ,

हो  न तसेच आहे रे ,अश्या  कित्येक केसेस आहेत जिथे मुली चुकीच्या असतात ,अश्या कित्येक केसेस आहेत जिथे काही फायद्या साठी मुली बॉस शी अफेअर करतात ,काम  मिळावे म्हणून स्वतहून संबंध ठेवतात नंतर ,त्यांच्यावरच बलात्काराचा  आरोप  लावतात ,त्यावेळेस कायदा पण त्यांना बलात्कारीच मानतो ,
बघ  न बर  आपला मुद्दा प्रेम प्रसंगाविषयी होता ,एका मुलीने मुलाला लग्नाला  नाही म्हटले कारण घरचे तयार नाहीत तर मुलीची  मजबुरी समजून घ्यायची ,अन स्वत:ला त्रास देत बसायचे ...हा गुन्हा नाही .
मुलाने मुलीला नाही म्हटले कारण सेमच ,तर मात्र मुलाने बलात्कार केला ...कठीण आहे रे मंग्या ...
अश्या केसेस मध्ये काहीतरी सुधारणा करायला हवी समाजाने आपल्या मानसिकतेत..
बाकी एखाद्या मुलीवर  तिच्या मनाविरुद्ध जर कोणी जबरदस्ती केली,तर  मात्र त्या येडझव्यांचे लिंग  कापून ,त्याच्या  माथ्यावर हा बलत्कारी आहे असे गोंदून सोडून द्यावे समाजात ..
पण काही ठिकाणी  मुलांची  चुकी नसते ,हे  हि समाजाने समजून घ्यायला हवे ,अन त्याच्या  पाठीशी  उभे रहायला  हवे ...

देव्या बरोबर आहे  लेका ,राहुल्याले  सांगू  का  तिच्यावर बलात्काराची   केस  टाक म्हणून साला  तिने  सोडल्यापासून  पागल  झालाय  दररोज  दारू  पितो ...घरचे  पण टेन्शन मध्ये  आहे  ...

मित्रा  तो  नाही  टाकणार  केस ,प्रेम  करतो  तिच्यावर त्रास  नाही  देणार तिला ,(किंवा  पुरुषावर  ही  बलात्कार  होतो हे समाजाने  आजवर  मान्य  केले  नाही ,म्हणून हिम्मत  करणार  नाही  तो )
असो  ,
इतकेच  बस बाकी काही  नाही ..
नि:शब्द(देव)

तळटीप: खूप सेन्सिटीव विषय  आहे ,मला  माहीत  आहे काही चिरकुट विरोध  करतीलच  ,पूर्ण वाचून  घ्यावे ,काय  म्हणायचे आहे हे समजून घ्या ,उगाच  आपले  खाल्ले  की  हागायला  बसायचे  असे  करू  नका ,नाहीतर सर्व परत तोंडात टाकल्या जाईल ...


Friday, June 17, 2016

डायरीत कोंडलेले प्रेम


भविष्यात कामी येयील ,असा भूतकाळ शोधत होतो ,
सज्जावरच्या अडगळीत ,
पुष्कळ आठवणी जमा झाल्या होत्या सज्ज्यावर ,
सायकल दिसली ,गंजली होती थोडी ,
त्याला घट्ट चिटकून असलेली एक आठवण ,
लगेच माझ्या मिठीत शिरली ,अश्या कित्येक आठवणी ..
मनात ,मिठीत शिरत होत्या ,
सिमेंट च्या पोत्यात पुस्तके भरू ठेवलेली ,
कदाचित माझे ज्ञान ही त्याच पोत्यात बांधून ठेवले होते मी आजवर ....
रडत दिसले ......

एक डायरी दिसली ,
ज्यात तुझा अन माझा, इतिहास कैद करून ठेवला होता ,
पहिल्याच पानावर ,
तुझे अन माझे नाव ...
शुभ -लाभ लिहितात तसेच ,
तू माझ्यासाठी शुभ होतीस ,आहेस ,
मी तुझ्यासाठी लाभ होतो ...हे उशिरा कळले ...
तुला ही वाटत असेलच ना ,
मी तुझा फायदा उचलला असे, जसे मला वाटत आले आहे ....

पान पलटवले ,
दुसऱ्या पानावर, तुला पहिल्यांदा ज्या दिवशी पाहिले होते ,
तो दिवस प्रेमात पडलेला दिसला...
आनंदी होता **...

पान पलटवले ,
तिसऱ्या,चौथ्या ,पाचव्या ,१०० व्या पानावर ,
तुला पहायला तरसत असलेले दिवस ,
तू दिसावी म्हणून तुझ्या घराकडे सायकलवर बसून ,
पूर्ण यवतमाळ पिंजून काढणारे दिवस ...
मी तुझ्या मागे नाही कामानिम्मित तिकडे आलो आहे ,
असे हुशारीपणा करणारे,
उत्सुक दिवस दिसले **
पान पलटवले,
पुढल्या काही पानांवर ....
थोडी हिम्मत वाढवून ,
तुझ्याशी मनातले बोलू असे विचार करणारे ,
घाबरट दिवस दिसले ...**
पान पलटवले,
पुढल्या पानांवर
'मला माहिती आहे तू मला जास्त ओळखत नाहीस,
मला माहित आहे,कदाचित तुला वाटेल मी लोफर आहे,
नुसता तुझ्या मागे फिरतो ,पण
'तू जेंव्हा लाजून थोडी घाबरून माझ्या समोरून गेलीस' ....
ही कविता म्हटल्यावर, मी तुझ्यावर प्रेम करतो "
असे सांगणारा एक याचक दिवस दिसला ...
आणि त्या दिवसाला तुझ्या दिवसाने दिलेला होकारही दिसला ...
ते पान खूप सुगंधी होते ..
तो दिवस ही सुगंधी दिसला...
पुढल्या पुष्कळ पानांवर ,
पुष्कळ प्रेमळ दिवस दिसले ,कधी हसणारे
कधी रुसणारे ,कधी भांडणारे ,कधी ......
त्यानंतर पान उलटले ,
आपण शेवटले भेटलो होतो तो दिवस दिसला ,
आत्महत्येचा विचार कारणारा दिवस,
हताश ,संतापलेला ,रडणारा ,तुटलेला ,***
त्या नंतरची सारी पाने कोरी होती ,
जखमा तश्याही दिसू देऊ नये म्हणतात ....
सिमेंटच्या पोत्यात ,
आपल्या प्रेमाच्या जखमांचे रक्त गोठले गेले होते ,(कदाचित )
असो ,
एक खरे आहे ,
आता कशाचाच त्रास मात्र होत नाही ,
आणि आनंद मुद्दामच शेवटल्या जखमासोबत ,
सिमेंटच्या पोत्यात बांधून ठेवतो ...

बस बाकी काही नाही ..

नि:शब्द(देव)






Tuesday, June 14, 2016

आसनास-तिक

आसनास...तिक
**********************************************************************************
आधी अलार्म लावायचो सकाळी उठायला ७ वाजता ,आता गरज नाही पडत ,पुढल्या सोसायटी मध्ये गणपती चे मंदिर झाले आहे ,जोर जोरात भोग्यामध्ये आरती म्हटली जाते ,त्यामुळे जाग येतेच ....रविवारी मात्र आयबहीन होते ,साले मंदिरातल्या देवाला ऐकू येत नाही म्हणून इतक्या जोराने भोंगा वाजवतात की ,मला ऐकू यावे म्हणून (मला देवा च म्हणतात अपघाताने ) चिडचिड झाली ....पण होऊन उपयोग काय ते माझे आई बाबा तर नाहीत ना ज्यांच्यावर चिडचिड काढू सर्व ,धार्मिकतेने पिसाळलेले प्राणी खतरनाक असतात ....म्हटले बघूच जावून असला कसला बहिरा देव बसवलाय ,गेलो मूर्ती तर अगदी सुंदर होती ,नमस्कार केला ,.
पुजारीने अंगारा लावला डोक्याला ,आणि लहान मुल चोकलेट साठी जसा चेहरा करतो तसा चेहरा केला ,मला लक्षात आले ,आणि मी तदहा रुपये टेकवले ही ....मित्र घरातून पाहत होता हे सर्व ,त्याने आवाज दिला ,मग गेलो त्याच्याकडे ....
का बे देव्या तू मंदिरात ,चक्क देवाने आज मंदिरात पाय ठेवला ..आश्चर्य आहे ..मले त बाम शिव्या देतो ,मी देव देव केले त ...
अबे तसे नाय ,मंदिरात गेलो ते कुठला बहिरा देव आहे हे बघायला ..
बाप्पा नमस्कार केलास ,दक्षिणा टाकलीस ..त्याचे काय ?
हे बघ नमस्कार त्या कलाकारच्या कलाकृतीला होता ज्याने मूर्ती बनविली ,सुंदर बनविले आहे ..आणि दक्षिणा हि त्या पुजार्याला यासाठी दिली कि तो मंदिर सांभाळणे ,साफसफाई ठेवणे ,मूर्तीला स्वच्छ ठेवणे असली काम करतो ,त्या कामगाराला ती मजुरी होती ..
त्याले त पगार भेटते ,मंग कायले दिली ,
हे बघ आपण दारू प्यायला बसतो ,पियुन झाल्यावर वेटर ला टीप देतोच ना तसेच आहे रे हे ,आपण बार मध्ये मन मोकळे करायला जातो ,शांत व्हायला जातो ,तसे काही लोक मंदिरात जातात ..आपली बार वर श्रद्धा आहे काही जणांची मंदिरावर ...
म्हणजे बार मधला वेटर म्हणजे मंदिरातला पुजारी का ?
नाही नाही ,फरक आहे दोघात ,बार जरी आपल्याला मंदिर असले तरी बार मधला वेटरसाठी आपण देव असतो तो आपली सेवा करतो ,आपल्याला जे हवो नको ते बघतो ....याउलट मंदिरातला पुजारी आपल्या श्रद्धे चा वापर करून त्या मूर्तीला काय हव नको ते बघतो ....
देव्या हे अति होतेय आता तुझे ?नास्तिक आहेस साल्या ....
काय अति होते आहे ?
तुला काय म्हणायचे आहे, देव नाही का जगात ?
मी असे म्हटलेच नाही ,आणि आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय रे ?
देवाला मानणारे आस्तिक आणि न मानणारे नास्तिक का ?असे नसते बे ..देवाला मानतात म्हणजे काय रे नेमके ? त्यांचा देवावर विश्वास आहे ,म्हणजेच त्यांचा दगडांवर विश्वास आहे ,म्हणजेच जुन्या काळात लेखकांनी घडवलेल्या देव नावाच्या पात्रांवर त्यांचा विश्वास आहे .... खरेतर दगडात ,किंवा त्या पत्रामधला देव खरा नाहीच ...खरा देव म्हणजे तो 'विश्वास '
जो चांगले काहीतरी करायला भाग पाडतो ...तो विश्वास जो तुम्हाला लोकांवर प्रेम करायला शिकवतो ...तो विश्वास म्हणजेच देव रे ,त्यासाठी मंदिरात जाणे ,दगडाची पूजा करणे ,एक रुपाया पासून करोडो रुपये त्या दगडाला दान करणे हे सर्व व्यर्थ रे ,देव समजून घ्यायचा आहे ना त्या दगडाला दान देण्या पेक्षा ,एखाद्या गरजूला पैसे दे ते ,बघ किती संधान मिळेल ...आणि तो समाधान म्हणजे देव .......
बर नास्तिक म्हणतो मला ,मी फक्त मंदिरात येत नाही ,दगडाला देव मानत नाही म्हणून नास्तिक का , विष्णूच्या पायाजवळ बसवलेल्या लक्ष्मी चा फोटो पाहून .हा स्त्रियांचा अपमान आहे असे म्हणतो म्हणून नास्तिक का ? गणपती चे मुंडके उडवल्या नंतर त्याला नवीन मुंडके बसवण्यासाठी एका हत्तीचा ही जीव घेणाऱ्या शंकारावर बोट उचलतो म्हणून नास्तिक का ? अबे माझा तुझ्यावर मित्र म्हणून विश्वास आहे ,तो विश्वास म्हणजेच देव रे ... तू म्हणतो तसा आस्तिक लोक दगडावर विश्वास ठेवतात ,अन मी लोकांवर ...फरक इतकाच ...पण एक गोष्ट जी साम्य आहे ती म्हणजे विश्वास ...तो विश्वास म्हणजेच देव ...
बाकी सर्व कथा आहेत रे ,बघ ना आपण भारतात राहतो सो आपण म्हणतो ब्रम्हा विष्णू महेश या तिघांनी हे सृष्टी बनवली ,मुसलमान दुसऱ्या कुणाचे नाव घेतात ,ख्रिचन दुसऱ्या कुणाचे ,इजिप्त वाले दुसऱ्या कुणाचे ,अमेरिकन दुसऱ्या कुणाचे नाव घेतात सो ही सर्व एका लेखकाची पात्र आहेत जी जुन्या काळात उभी केल्या गेलीत , स्वार्थासाठी वापरल्या गेलीत ,भितीपोटी समाजात रुजवून घेतल्या गेली ...आणि वर्षानुवर्ष त्यावर बोट न उचलता तीच गोष्ट चालवत आलोय आपण ...
बघ ना तू मंदिरात बसून दारू पियू शकतो का ? नाही ना कारण तसे केलेस तर लगेच हजारो जमा होतील अन तुझा खून करतील ,पण रस्त्यावर अपघात होऊन कुणी पडला असेल तर एक जन उचलायला येणार नाही असे आहोत रे आपण ,धार्मिकतेने पिसाळलेले अज्ञानी माणसे ..
बर कणाकणात जर देव आहे असे तू म्हणतोस ...तर मग दारूत का देव नाही ? दारू या सृष्टीचा हिस्सा नाही का ?देवाच्या मर्जीशिवाय इथला पत्ता पण हालत नाही,देवाने सर्वांच्या नशिबात काय होणार हे आधीच लिहुन ठेवलाय असेही म्हणतोस ना ? मग कुणावर बलात्कार झाला तर तो देवाने लिहुन ठेवला असेल ना तिच्या नशिबात ? म्हणजे देवच दोषी ना ?अरे ऐसा नही रहता दोस्त ....
गाडगे बाबा बोलून गेलेत देव दगडात नाही माणसात आहे,जन्मभर लढले लोकांना समजावत फिरले ..
आणि त्याच गाडगेबाबांना दगड बनवून त्यांचे मंदिर बांधणारे आपण
देव कसा काय कळणार रे आपल्याला ....
मग देव आहे की नाही ?
आहे ना ,मी घरी गेल्यावर जेंव्हा माझी मुलगी अंगावर झेप घेते ,अन खांद्यावर शांत डोके ठेवते ,तेंव्हा तिचा जो आपल्यावर विश्वास असतो ,जे प्रेम असते ते प्रेम म्हणजे देव रे ....ती तुझ्या कडेवर असताना जी तुला शांतता मिळते ती शांतता म्हणजे देव रे ...रस्तावर पडलेल्या अपघातग्रस्त माणसाला जेंव्हा कुणी मदत करतो ती मदत म्हणजे देव रे .
मुलांच्या फी साठी दिवसरात्र बाप जेंव्हा घाम गाळतो ,तो घाम म्हणजे देव रे ...अगणित वेदना सोसून आई जेंव्हा बाळाला जन्म देते ,ती वेदना म्हणजे देव रे ....
बघ ना आता इतक्या जोरात भोंगा वाजवून आरती म्हणताय ,सोसायटी मध्ये नुकतेच जन्मलेले बाळ असेन त्याला किती त्रास होत असेल ना ?नाईट शिफ्ट करून कुणी घरी येवून झोला असेल ,त्याला किती त्रास होत असेल ना ,असे कित्येक जन असतील ज्यांना याचा त्रास होत असेल ,आणि ज्याचा कुणाला त्रास होतोय ती आरती तुझ्या देवाला तरी मान्य असेल का ?आणि कुणी येवून म्हणायची हिम्मत पण करू शकत नाही की बंद करा हे ...त्याचा तुम्ही जीव घ्याल... ही जी भिती आहे ती तुम्ही बनवलेल्या देवाची आहे ....खरा देव वेगळा आहे रे ...
उद्या मंदिरात कुणी काही मारून फेकले ना अखे जग एकत्र येयील तोडफोड करेल ,पण इतके शेतकरी मारताय त्यांच्यासाठी आपण एकत्र येणार नाही ,हा तुमचा देव आहे ....तो संपलेला बरा मित्रा ...
खऱ्या देवाला आणुयात कि आतातरी या जगात ...मुखवटे लावलेल्या देवापासून मन भरणारच नाही का तुमचे ?
कसय मित्रा दगडाचा देव करतां करता  ,माणसाचा दगड झालाय हेच आपल्याला आजवर नाही कळले...
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

Monday, June 13, 2016

अपेक्षाभंग....



(रविवार म्हटले कि शनिवारी रात्री जागायचे ३, 4 वाजेपर्यंत रविवारी उशिरा उठायचे ,इतके एक धोरण मी आजवर पाळू शकलो आहे ,तर १२.४७ ला उठलो ,पाकिस्तान वर हल्ला केला ,रात्रभर तोंडात आश्रय घेतलेल्या किड्यांना बेसिन मध्ये टाकून ,अंगावर पाणी ओतून ,गरजेच्या ठिकाणी साबण चोळून ,अंगाला पवित्र केले ...मोबाईल पाहिले मित्राचा मिस कॉल(मोबाईल सायलेंट असतो माझा नेहमी ).. फोन लावला )
काय बे ,
ये टपरीवर चहा घेवू ..
आलोच ...(पोहचलो ,तो चहा सोबत सिगरेट हे ठरलेले असते ,आज त्याचा चेहरा जरा उदास वाटला )
कावून बे काय झालंय,
एक असेन तर सांगू बे ,साला झंड झाली हाय जिंदगी ,
एक काम कर एक एक सांग ,बोलू त्यावर
काय नाय बे आपण कितीही चांगले राहिलो तरी साले लोक मारतातच आपली ,
कोण मारली तुयी आता
काय नाय बे घरचे म्याटर आहे जास्त बोलू शकत नाही ,
बर (आमच्यात एक आहे घरी कितीही प्रोब्लेम असले तरी खुल्लम खुलला बोलत नाही ,घरच्यांचा आदर एकमेकांच्या नजरेत टिकवून ठेवतो,पण कितीही चांगले वागले तरी ,त्याच्या या वाक्याने लक्षात आले ,अपेक्षा भंग चा म्याटर दिसतोय ,बोललो मग ,फंडे मारायची सवय आपल्याला )
ये भाई गरम दे ,और एक चाय दे फिरसे ,
बर ऐक ,जगात प्रत्येक व्यक्ती हा खुश राहायचा प्रयत्नात असतो ,अन प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते ,तो स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो ,आणि कधी कधी जेंव्हा दोन लोकांचे आनंद एकमेकांसमोर येतात तेंव्हा कुणाच्या तरी आनंदावर विरजण पडते ,तिथे अपेक्षाभंग होतो ....
(त्याने आत ओढलेला धुआ ,अन शब्द ,नवरा बायको सारखे त्यांच्या तोंडातून बाहेर पडले )
म्हणजे ? मला काय कळले नाय काय बोलतोय ...
(तो बोलताना मी आपला आत ओढला होता धुआ ,सो सोडताना कॉलर टाईट करूनच निघला),
बर हे बघ तू बोललास ना कितीही चांगले वागले तरी लोक मारतातच आपली ,आपण चांगले वागलो असे आपल्याला वाटत असते ,पण दुसऱ्यांना तसेच वाटेल असे नसते ,आणि आपण चांगले वागलो ,म्हणून समोरच्याकडून काही अपेक्षा ठेवतो ,कि त्याने आपल्यासोबत असे वागावे तसे वागावे ....पण तो आपल्याला वाटेल तसे का वागणार ना ,त्याला त्याची विचारशक्ती आहे ,त्याच्या जवाबदार्या आहेत ,आवडनिवड आहे ,तो त्याला हवे तसेच वागेल ,तेंव्हाच तो आनंदी राहू शकेल ,आणि तो तसा वागला की आपला भ्रम तुटतो कारण आपण विचार केला असतो कि त्याने माझ्यासोबत अमुक अमुक पद्धतीने वागावे ....खरेतर वाईट तो तसा वागला याचे वाटत नाही आपल्याला ,आपल्याला हवा तसा तो वागला नाही याचे वाटत असते ...
आणि जगात चांगले वाईट असे काही नसते रे ,खूप पुसट शी रेषा आहे चांगल्या अन वाईट मध्ये ...व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असणारच ,जनरली ना आपण जे हि नाते जोडतो किंवा जोडल्या गेलेली नाती असतील (रक्ताची ) ही सर्व नाती ,एकाच धोरणावर चालत असतात ,तो म्हणजे स्वार्थ(आणि हे आपल्याला ही कळत नसते ) ...जिथे आपल्या स्वार्थावर गदा येते तिथे त्या नात्यात दरार पडली बघ ....
आई बायकोत पिसल्या जात आहे रे ....
(मी बोललो ते त्याला कळले हे मला कळले ,अन लक्षात आले सिगरेट संपत आली आहे ,चहा थंड झाला आहे ,गरम करायला दिला ,अन एक सिगरेट परत मागवली )
मित्रा आपले जम्मू कश्मीर सारखे झाले आहे ,आई भारत अन बायको पाकिस्तान ,किंवा आई पाकिस्तान अन बायको भारत किंवा कधी कधी तर आई अन बायको दोन्ही पाकिस्तान ....
कळतच नाय रे कसे वागू ,
हा हा ,बरोबर ,हे बघ हे न उलगडणारे कोडे आहे ,इथे साक्षात देव बी आला तरी काही करू शकत नाही ...त्या दोघीच करू शकतात काय ते ,बायको ला वाटत असते मी इतकी चांगली वागते तरी सासू असे करते ,अन सासू ला वाटते कि मी इतकी चांगली वागते तरी सून असे करते ,
अन तुला वाटते तू इतका चांगला वागतो तरी त्या दोघी अश्या करतात ...
बघ न किती गम्मत आहे ,आता तूच संग चांगले नेमके कोण वागते ?
सर्वांचा आनंद जेंव्हा एकमेकांसमोर येतो तेंव्हा तलवारी उपसल्या जातात ,आणि लढाई चालू होते यात मुलाचा आनंद बेमोत मारल्या जातो ,कारण समोर लढणार्या दोन्ही त्याचेच असतात ....मात्र त्या दोघांचे आनंद काही मानत नाही ...
काय करावे मग ...
यावर हे सोलूषण आहे कि नाही माहित नाही ,पण एक कर आजपासून जेंव्हाही घरी जाशील ,त्यांच्यात काहीही वाद होऊ दे लक्षच नाय द्यायचे ,घरी पोहचला कि बायको वर पण चिडचिड करायची अन आईवर पण चिडचिड करायची ,ताटावर बसले की जेवणावरून चिडचिड करायची ,रागात उठायचे ,बाहेर निघून जायचे ,एक प्याक मारायचा मस्त ,दाबून जेवायचे ,अन घरी जायचे ....त्या दोघी एकत्र होतात कि नाही बघ मग ,तुझी काळजी घेणे सुरु करतील एकमेकांशी न भांडता ..
जेंव्हा काही प्रोब्लेम सुटत नसतात ,तेंव्हा आपण एक स्वत: नवीन प्रोब्लेम क्रियेट करायचा ...मग त्यावरच त्या दोघी खेळत बसतील ,
अमेरिके कडून शिक बे काही ...
हव साला असेच करतो आता ,पण तरीही नाही बदलले काही तर ,
मी हाय ना काड्या लावायला :p :p
हा हा ,असो कधी कधी सर्वांच्या भल्यासाठी करावे लागते रे ,आपल्याला काय त्या दोघी आनंदी असल्या की बस ....
हम्म ....
चल एक प्याक मारून येवू .....
(साला तो हे बोलताच कळले ,दारू पिण्यासाठी जसे काहीही कारण वापरू शकतो ,तसे सुखी राहण्यासाठी शोधू शकलो असतो तर ?...डोक्यात आले ,आता पिताना मारतो यावर फंडे असा विचार केला अन बोललो )
चल ...घरी सांगतो गाडी पंक्चर झाली आहे ...
नाहीतर आईला टेन्शन येयील ...
सिगरेट फेकली ,अन पायांखाली चिरडली परत ,
कित्येक आयुष्य तसेच आई बायकोच्या भांडणात चिरडल्या जात असतील नाही का ?
असो ,
चलता है ,जिंदगी है ,असे म्हणायचे
अन जगायचे ...
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

Saturday, June 11, 2016

प्रेम एकदाच होते म्हणे ? हो का .......असेल बा

प्रेम एकदाच होते म्हणे ? 
हो का .......असेल बा
*****************************************************
मोबाईल ची रिंग वाजली ,माझी रिंगटोन (अजीब दास्ता है ये ) मला फार आवडते ,त्यामुळे सहसा मी फोन रिसीव नाही करत ,फोन कुठेतरी पडलेला असतो ,रिंग संपली ,परत रिंग वाजली ,म्हटले कोण तरी गरजू दिसतोय ,बघितले तर सख्या मित्राचा फोन ,उचलला मी ,अन बोललो कारे चोम्न्या काय बोलतो
(तिकडून पगार न झाल्यावर जी अवस्था होते ,त्या अवस्थेत निघणार्या आवाजात तो बोलला)
नवश्री वर बसलोय दोन तास झाले ,चढली आहे ,ये लवकर ,कळत नाही आहे काय होऊन राहिले ...
साल्या ,थांब आलोच ....
(नाशिबाला लात मारतो तशी ,गाडीला किक मारली आणि पोहचलो टेबलवर ,
हातात सिगरेट होती त्याच्या ,घेतली अन एक कश मारत बोललो )
आता कशावरून भांडण झाले तुमच्या दोघात ?(तो प्यायला या एकाच कारणाने बसायचा ,आणि नेहमी असाच फोन यायचा मला ,म्हणून कारण माहित होते )
संपले बे देव्या सारे , संपले (*वेटर त्याच्या ग्लास मध्ये ज्या पद्धतीने दारू ओतत होता त्याच पद्धतीने त्याला झालेला त्रास, त्याच्या डोळ्यात अश्रू ओतत होता बहुतेक* )
ब्रेकअप झाले ...सब झूठ है साला ,HELL WITH THIS FUCKING LIFE ..
(त्याच्या हातात सिगरेट देत बोललो ) घे सिगरेट घे ,अन सांग काय झाले शांत पने ,काहीतरी मार्ग काढू आपण ....
तिला मी नकोसा झालोय ,तिला दुसरा कोणी आवडायला लागला आहे ,तिने तसे सांगितले नाही पण कळते रे प्रेम करतो तिच्यावर ,पण असे कसे यार,, मला ती सोडून दुसरे कोणीच आवडत नाही ,प्रेम एकदा होते रे फक्त ,तिचे माझ्यावर प्रेम नव्हतेच साला टाईमपास करत होती साली माझ्यासोबत ,(अन रागात मोबाईल उचलून काहीतरी टाईप करायला लागला ,माझ्या लक्षात आले ,मी मोबाईल हिसकावून घेतला अन बोललो )
तू तिला काही मेसेज पाठवणार नाही आहेस ,आपले बोलणे झाल्याशिवाय ,
खतम हो गया रे देव्या सब ,खतम हो गया (उधारीत बियाणे आणून मोठ्या आशेने पेरल्यानंतर अवकाळी पावसाने सारी नासाडी केली ,की शेतकऱ्याची जी हालत होते ,तशी काही त्याची झाली होती )
इकडे बघ,साल्या इकडे बघ म्हटले ना ,(एक घोट घेतला या दोन वाक्याच्या मधात ) ,बर चल बोलू यावर ,ऐक काय म्हणतोय मी ,मग तुला जे मेसेज करायचे ,जी आई घालायची घाल ,पहिले ऐक फक्त माझे ...
चल पकडू कि तिचे दुसऱ्या कुणावर तरी प्रेम झाले असेल ,
(इतके बोलत नाही मी कि लगेच ,तोंडाजवळ आणलेला ग्लास आपटत बोलला )
पकडू नाही आहेच ,साली हरामी ,खतम हो गया रे देव्या सब खतम,
ऐकना भोसडीच्या काय म्हणतोय ,नाहीतर जातो उठून (इतके बोलल्यावर मात्र ऐकायच्या मूड मध्ये मजबुरीत का होईना आला असावा )
तर चल तिचे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे आता ,आणि जिंदगी आहे रे दुनियेत खूप चांगली लोक आहेत ..आपण आपल्याला जेवढी लोक भेटतात ,त्यातली ,आपल्या स्टेटस ला आपल्या अपेक्षांना पूर्ण होणारी कोणी दिसली की तिच्या प्रेमात पडतो ,कधी ऐकलेस का आपल्या कुठल्या मित्राला भिकारीवर प्रेम झालंय वगेरे ? नाही ना ,आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या ,आपल्या अपेक्षेनुसार पात्र ठरणाऱ्या पोरीच्या प्रेमात पडतो ,स्वार्थी प्रेम असते रेसार्यांचे ,अपेक्षा म्हणशील तर कुणाची सुंदरता असते ,कुणाची समजून घेणारी ,कुणाची काय अन कुणाची काय ...त्यानंतर प्रेमप्रकरण चालू ,त्यांनतर हि बरीचशी मंडळी भेटत जातात ,त्यात हि खूप चांगली लोक असतात ,त्यातले ही कुणी आपल्याला आवडायला लागते ,आणि हे साहजिक आहे रे आपण माणूस आहोत ,आताअश्यावेळी दुसरा कोणी आवडायला लागला तर दोन पर्याय असतात ,
१. एकतर मनात दाबून ठेवणे (आपल्या समजात एकासोबत असताना ,दुसर्याशी नाते जोडू नये या नात्यात असा अलिखित नियम आहे आणि त्या नियमात अडकले जातात काही )पण मनात दाबून ठेवले तर याचा अर्थ काय, ती मानसिक दृष्ट्या जेंव्हा त्याची झाली ,तेंव्हा ते नाते जोडल्या गेलेच ना ? बस ती सांगत नाही ,आणि ते नाते समोर नेत नाही म्हणजे ती प्रामाणिक का ? नाही मला नाही वाटत असे ,तिचे शरीर राहते तुमच्याकडे बस अश्या वेळेस तिचे मन नाही ? आणि शारीरिक प्रामाणिकता हीच श्रेष्ठ प्रामाणिकता असे आपल्या समाजात गोंदवल्या गेले आहे ,उलट एकदा सेक्स केला कि दुसरा दिवशी साला झ्याट काही गंध हि उरत नाही त्याचा ,पण त्याला आपण महत्व देणार ,पण मानसिक दृष्ट्या कुणाची झाली ती ,तर जन्मभर ती सल तिच्या मनात राहील ,न ती सुखी असेल न तू ...राहिले
दुसरा पर्याय
२. सांगून मोकळे होणे ...इथे खरी प्रामाणिकता येते ,तिला तो आवडायला लागला आहे ,माणूस आहे आवडू शकते ,आणि जर तिला वाटत असेल की त्याच्यासोबत ती तिची जिंदगी खुशीत काढू शकते ,तर मग हा तिचा निर्णय ,तिच्या जीवनाचे निर्णय घ्यायला ती मोकळी असते ,तुला एकच मित्र आहे का ,तुला खूप मित्र आहेत ना तसे प्रेम ही खूप जणांवर होऊ शकते ,फक्त मैत्रीत आणि प्रेमात एकच फरक ,शारीरिक बंधन ...
ऐकतोय का कि चढली लै?
बोल ऐकतोय ,(त्याच्या लक्षात आले खूप वेळचा त्याने प्याक मारला नव्हता ,ग्लास उचलून प्याक मारत बोलला बोल )
तर हे बघ ,तिला वाटत असेल ना ती त्याच्यासोबत खुश राहू शकते ,जाऊदे ना यार तिला ,आणि तू तिच्यावर प्रेम करतो ना ? मग ती खुश राहणे म्हत्वाचे की तुझी होऊन राहणे म्हत्वाचे ) आणी ती जर फसवणारी मुलगी असलीच ,तरी बरे ना जाऊ दे जाईल तिच्या कर्माने एकदिवस ...तू कशाला त्रास करून घेतोय ,ती खुश तो मै खुश बोलनेका ,भोकात गेली दुनियादारी ,लागायचे आपल्या कामाला ...
देव्या बोलने सोप्पे आहे रे ,१४ वर्ष होऊन गेले तू त्या ११ वी वालीला विसरलास का ?
नाही विसरलो खरे आहे ,पण जेंव्हाही तिची आठवण येते ,मला त्रास होत नाही मला आनंद होतो ,मी एन्जोय करतो तिची आठवण पण...बघ ना आता मी गोव्याला गेलो होतो ,मला गोवा खूप आवडला ,धमाल केली ,येताना जरा वाईट वाटले ,पण आता मला गोव्याची आठवण आली तर मी हट्ट धरतो का गोव्यालाच सेटल व्हायचे म्हणून ? मी फोटो पाहून आनंदी होतो ...तसेच नात्यांचे असते रे तुम्ही सोबत घालवलेल्या क्षणांना आठवून एन्जोय कर ,संपले संपले म्हणून काय रडत बसतो ,उठ साल्या आम्हाले काय किंमत आहे का नाही ,आणि कधी कधी दोन चांगले व्यक्ती एक चांगले आयुष्य नाही जगु शकत सोबत ...सोड
(त्याच्या चेहर्यावरून तरी वाटत होते पटले त्याला )
हव साला खड्ड्यात गेले सर्व ,काय बिघडत नाही, गेली त गेली बरे झाले आता गेली ,लग्न झाल्यावर गेली असती तर आयुष्य उध्वस्त झाले असते (जरा आवजात जोर दिसत होता त्याच्या ,ओरडला... वेटर एक ब्लेंडर्स आणि दोन गरम रिपिट)
अबे किती पेशील चल घरी आता ,
नाही बे एक प्रश्नाच उत्तर दे ?
मी बोललो,आता काय अजून
ते तू गोव्याचा बोलला ना ,मस्त बोलला यार ,बम बाता मारता तू ,पर एक चीज बता,गोव्याले सेटल व्हायचा हट्ट नाय पकडत आपण ,हे बरोबर आहे ,पण वाटले तेंव्हा परत गोव्याला जाऊ शकतो ना ?मग नात्याचे काय ?
(एवढी पिल्यानंतर माणूस हुशार होतो याचा प्रत्यय आला मला )मायला ,मला वाटले तुला चढली ,
(अन मग तो कधी आणि किती पिला याच्या गप्पा मारत बसला ,त्याच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नव्हते ,आणि त्याला ही माहित असावे ,म्हणून त्यानेही नंतर विचारले नाही )
अबे अपनेको चढती क्या कभी दोस्त ?
एक काम कर पैसे नाही आहे देव्या आज,तू दे बिल, उद्या देतो तुले ..
(हे ऐकून माझा प्रेमभंग झाल्यासारखे वाटले मला ,बिल मीच देणार मग कायले झोल आता )
मी पण बोललो ,वेटर ९० लेके आ एक ,और एक गरम
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

Thursday, June 9, 2016

'आ' रक्षण

'आ' रक्षण

तू नेहमी आरक्षणाला विरोध करताना दिसतो ,नेमका प्रोब्लेम काय आहे तुझा ,तुला माहिताय का आपल्यावर किती अन्याय झालाय तो ? किती सोसले आहे आपण ,काय काय करवले आहे या लोकांनी आपल्याकडून ,नेहमी पायाशी दाबून ठेवले आहे ,
(हे कधी झाले तेंव्हा मी जिवंत नव्हतो ,आणि भूतकाळ उकरूनउकरून भविष्याची सोय करणे हे कधी तत्वात बसलेच नाही माझ्या )

मी बोललो ,प्रोब्लेम खूप आहेत ग, पण तू त्या आधी संग तुला आरक्षण का हवे असते वाटते ?

बोलले की किती त्रास दिला आहे आपल्याला ,किती सोसले आहे आपण ? आणि लहान जातीच्या लोकांनी वर जाउच नाही का ?

का नाही ?सर्वांनी वर जावे ,सर्वांचा विकास व्हावा ,पण कुणाच्या घरची भाकर चोरून आपले पोट भरू नये इतकेच माझे म्हणणे ..

चोरून ? आम्ही चोरून नाही आमच्या हक्काची भाकर खात आहोत ..

हक्काची ?असो चल बोलू यावर आता ,हे बघ आरक्षण ज्या काळात दिले गेले ती त्या काळाची गरज होती ,तू म्हणते आहेस तसे व्हायचे आधी ,जात पात धर्म या गोष्टीना जास्त म्हह्त्व होते ,आणि छोट्या जातीवले लोक हे फार गरीबअसायचे त्यांना खाण्या पिण्याचेही वांदे असायचे ,म्हणून त्या काळात आरक्षण देणे गरजेचे होते ,पण आता तशी स्थिती नाही उरली ,अन माझा आरक्षणाला विरोध नाहीच मुळात ,इतकेच म्हणणे आहे की आर्थिक मोजपट्टीवर जर आरक्षण दिले तर काय वाईट आहे ,तू जसे म्हणते आहेस तसे जर छोट्या जातीतला कुणी असेल तर त्याला नक्कीच मिळेल ना आर्थिक दृष्ट्या जरी आरक्षण हा निकष लावला तर ...
पण जेछोट्या जातीचे आहेत पणआरक्षणाचा फायदा घेवून आज काही बनले आहेत ,ज्यांच्याकडे आज बक्कळ पैसा आहे ,त्यांना काय गरज आहे आरक्षणाची ?ते त्यांच्या मुलांना ते सर्व काही देवू शकतात जे मोठ्या जातीतले लोक देतात ...अश्या लोकांनी आरक्षण का घ्यावे ? आणि तुला कळते का ग ,देशाचा किती पैसा अश्या लोकांवर खर्च होतोय ज्यांना गरज नसताना ही फक्त जातीचे आहेत म्हणून आरक्षण हवे असते ...तो पैसा शेवटी इथल्या प्रत्येकाच्याच खिश्यातून जातोय ना ,आणि हे लोक जे सक्षम असतानाही आरक्षण घेतात् म्हणजे त्यांच्याच जातीतल्या एखाद्या गरीब गरजूला आरक्षण मिळत नाही ,इतके साधी गणित का लक्षात येत नाही तुझ्या , इतकाच पुळका आहे ना मग हेलोक आरक्षण घेणे बंद का करत नाहीत ? आता हे सक्षम असणारे लोक त्यांच्याच जातीतल्या लोकांवर अन्याय करीत आहेत असे नाही वाटत का तुला ?हक्काची भाकर म्हणे ...आर्थिक दृष्ट्या आरक्षण हा जर निकष लावला तर छोट्या जातीतले गरजू आणि गरीब यांना फायदा होईलच पण त्याच बरोबर ,देशातल्या सर्व गरजू लोकांना समोर येण्याची संधी मिळेल ,आणि तेंव्हा कुठे खरा विकास होईल ....आणि आरक्षण विषय यावर काही बोलले की लगेच बाबासाहेबांचे नाव घेवून विशिष्ठ जातीचे विरोध करायला तयार आहेतच की ....ज्यांना बाबासाहेब कधी कळलेच नाही आणि एका थोर नेत्याला स्वार्थासाठी फक्त दलितांचा नेता इतकेच बनवून ठेवले यांनी ,यांना काय माहित बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाही त्या पल्ल्याड खूप मोठेव्यक्तिमत्व होते ...पण स्वार्थ आणी राजकारण्याच्या हातचे खेळणे झालेला समाज कधी बदलू देणार नाही हे चित्र ....आपल्याला ना लढायचे नाहीच आहे मुळात हा मोठा प्रोब्लेम आहे आपला ,सर्व कसे आयते आणि कमी कष्टात मिळावे ,
बाबासाहेब स्वत: लढले ,त्यांच्याकडून लढावू पणा घ्यायला हवा होता ,त्यांच्याकडून अन्याया विरुद्ध उभे राहणे हे घ्यायला हवे होते ,पण आपण हे कसे घेणार ना ,आपण त्यांच्याकडून फक्त एक घेतले आरक्षण कारण तितकेच आपल्या फायद्याचे होते ...स्वार्थी साले सगळे ,देशाचे वाटोळे करायला निघालेत ,जात जात म्हणून ....

तू काहीही म्हण पण आरक्षण पाहिजेच उद्या महिलांच्या आरक्षणावर ही बोट उचलशील तू ,तुझे काय

हो का नाही ,अरे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतोय आम्ही असे जेंव्हा म्हणता,तेंव्हा तुम्ही स्वत: मान्य करता ना पुरुष हा श्रेष्ठ आहे ,कारण नेहमी श्रेष्ठ गोष्टींशीच तुलना करतो आपण आपली ...तुम्हाला आम्ही कधीच छोटे समजलो नाही ,तुम्हीच पुरुषांना शत्रू समजायला लागलात ,प्रोब्लेम्स आहेत ना मान्य आहे ,पण ते प्रोब्लेम पुरुशांमुळे नाही तुमच्याच लोकामुळे आहेत ...तुम्हाला लढायचे नसते , तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेत नसता माणूस म्हणून जन्म घेता ,आणि स्त्री तुम्ही बनत जाता ,का बनता ना स्त्री ? का नाही लहानपणापासून तुझ्या मुलीला तू मुलासारखे खेळू देत ,का नाही तिच्यावरही जवाबदार्या टाकत जश्या मुलांवर टाकल्या जातात ,का नाही लग्न झाल्यावरही ,तुझ्या आईवडिलांचा सांभाळ करत ,कारण तुम्हाला हे नकोय तुम्ही मान्य केलेय की आम्हाला असेच जगायचे आहे ,हा मोठा प्रोब्लेम आहे ,फक्त प्रोफेशनल मोठ्या मोठ्या पदावर येताय म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतंय असे जेंव्हा म्हणता न हसायला येते तुमच्यावर ,आणि त्यात ही आरक्षण हवेच त्याच्यामुळे ,स्वाती संतोष महाडिक बद्दल लिहिले होते मी वाचले का ? नवरा शहीद झाला तरी खचली नाही हि बाई लढली आणि स्वत:ही भारती झाली सैन्यात ,तुम्ही लढू शकत नाही असे नाही आहे ,तुम्हाला लढायचे नाही हा मुद्दा आहे ....'आ' रक्षण या कुबड्या आहेत ज्या धडधाकड माणसाला अपंग करतात ,तो आपल्या क्षमतेप्रमाणे वागायचे करायचे विसरूनच जातो ,असो मला माहिती आहे हे बदलणार नाही ,पण कमीत कमी मी तरी माझ्या विचारांवर चालेल आणि माझ्या मुलीला एका माणसासारखे जगवेल मुलगी मुलगा,जात धर्म यापल्ल्याड,आयुष्य हे हसत खेळत लढत पडत उठत जगायचे नाव आहे हे शिकवेल तिला ...

हो का ? बघू तसेही तुझ्या सारख्यामुळे आपल्या जातीचे लोक मागे आहेत ....

आपल्या जातीचे ? हा हा जात ही त्या काळात जो जे काम करायचा त्यावरून ठरवण्यात आली होती ,आज मी तुझ्या जातीचा नाही , शिक्षक या जातीचा आहे ,
त्यामुळे आपली जात वगेरे या भानगडीत नको पडू ...

बर ह, आम्ही मात्र आरक्षण घेणारच ,जे करायचे ते कर तू ....(तनतन करत निघून गेली ती )
मी हसत बोललो
'आ' रक्षण कर रे बाबा देशाचे
बस बाकी काही नाही ..

नि:शब्द(देव)